Thursday, December 9, 2010

Lettest News राजापूर- जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प

कॉंग्रेस पदाधिकारी शिवसेनेच्या भूमिकेला उत्तर राजापूर- जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्याचा आधार घेऊन शिवसेना कोकणावर पुन्हा राजकीय वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसऱ्या बाजूला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा मुद्दा संपुष्टात आणण्यासाठी कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांकडून प्रकल्पग्रस्त आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची थेट चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकेकाळी कोकणावर असलेले समाजवाद्यांचे वर्चस्व मोडीत काढून कॉंग्रेसने वर्चस्व मिळविले होते मात्र 1990 च्या दशकामध्ये शिवसेनेच्या आलेल्या झंझावातामध्ये कॉंग्रेस नेस्तनाबूत झाली होती. पक्षांतर्गत राजकारणामुळे नारायण राणे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर शिवसेनेला कोकणच्या बालेकिल्ल्यात मोठा फटका बसला. आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी शिवसेनेने येथील जैतापूर प्रकल्पाचा मुद्दा हाती घेतला. कार्याध्यक्ष श्री.
Friday, December 10, 2010 AT 01:00 AM (IST)
सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेची मागणी जनतेत संभ्रम कणकवली-  जैतापूर येथे आशियातील सर्वांत मोठा एक लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा अणुऊर्जा प्रकल्प होत आहे. या विरोधात कोकणाबाहेरील सामाजिक चळवळीचे नेते आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी येऊन विरोध करत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र या प्रकल्पाबाबत काहीच बोलत नाहीत. त्यामुळे जनतेत संभ्रम आहे. यावर मार्ग काढण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांनी येथे येऊन मार्गदर्शन करावे. प्रकल्पाचे फायदे-तोटे आणि वस्तुस्थिती समजावून सांगावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेने पत्रकातून केले आहे. कोकणला सध्या विकासाची गरज आहे. जर अणुऊर्जा प्रकल्पातून परिसराचा मोठा विकास होत असेल तर त्याला आडकाठी येता कामा नये, विरोध असता कामा नये. त्याचबरोबर प्रकल्पासून जनतेला धोके पोचत असतील तर त्याबाबतचीही माहिती जनतेसमोर यायला हवी. वस्तुत: याबाबत योग्य ती माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रकल्प निर्माण करणाऱ्या संस्थेने तसेच राज्य शासनाने येथील जनतेला द्यायला हवी पण तसे न झाल्याने प्रकल्पग्रस्त आणि भूमिपूत्र दिशाहीन होऊन रस्त्यावर आला आहे.
Friday, December 10, 2010 AT 12:45 AM (IST)
सिंधुदुर्गवासीयांची मागणी: शासनाच्या दंडुकेशाहीचा निषेध सावंतवाडी- जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात कोकणवासीयांनी केलेले तीव्र आंदोलन मोडून काढण्यासाठी शासनाने दंडुकेशाहीचा वापर केला, असा आरोप करीत या अन्यायकारक नीतीचा विरोध करण्यासाठी संघटित झालेल्या ग्रामस्थांनी आज प्रांताधिकारी एस. के. शालीमठ यांना निषेधाचे पत्र दिले. तसेच आंदोलकांवर दाखल केलेले खटले शासनाने ताबडतोब मागे घ्यावेत, अशी मागणी केली. या संदर्भात जैतापूर, माडबन पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सिंधुदुर्गवासीयांच्या वतीने पाठिंबा व्यक्त करण्यासाठी 16 तारखेला माडबन येथे जाण्याचा निर्णय आज येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते प्रा. गोपाळ दुखंडे यांच्या अध्यक्षतेखाली येथे जिल्ह्यातील प्रदूषणकारी प्रकल्पबाधित गावच्या ग्रामस्थांची बैठक झाली. यात जैतापूर आंदोलनासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जैतापूर, माडबन परिसरात होऊ घातलेला देशातील सर्वांत मोठा अणुऊर्जा प्रकल्प कोकण किनारपट्टीसाठी धोकादायक आहे, असा सूर बैठकीत उमटला. अणुऊर्जा प्रकल्पाचे दुष्परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यावर होणार आहेत.
Friday, December 10, 2010 AT 12:15 AM (IST)
आठवड्यातून दोनदा पोलिस ठाण्यात हजेरी घेणार राजापूर- जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील जेलभरो आंदोलन प्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल झालेल्या चौदांपैकी बारा जणांना रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायाधीश दिवाकर रत्नाकर यांनी आज प्रत्येकी 15 हजाराच्या वैयक्तिक जामिनावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांना आठवड्यातून दोनवेळा नाटे पोलिस ठाण्यावर हजेरी लावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. अटकपूर्व जामीन मंजूर झालेल्यांमध्ये प्रकल्पविरोधी जनहित सेवा समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर, मच्छीमार नेते अमजद बोरकर, कोकण बचाव समितीचे डॉ. विवेक भिडे, वजूद आदम बेबजीद, सादप अब्बास हबीब, आदम दाऊद मुजावर, बाबासाहेब अलतीफ कोतवडेकर, श्रीमती जुबेदा हुसेन भाटकर, रिहाना शौकत भाटकर, फातिमा सुलतान गोवळकर यांचा समावेश आहे. प्रकल्पाच्या विरोधात गेल्या शनिवारी स्थानिक ग्रामस्थांनी हे आंदोलन केले होते. त्यात साखरीनाटे, नाटे, तुळसुंदे आदी भागातील मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीमुळे आंदोलन चिघळून पोलिसांच्या गाड्यांना आंदोलकांनी हल्ल्याचे लक्ष्य केले.
Thursday, December 09, 2010 AT 01:00 AM (IST)
प्रकल्पाला विरोध नसल्याचा भाजपचा खुलासा नवी दिल्ली- जैतापूर या देशातील पहिल्या नागरी अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने कडाडून विरोध सुरू केला असला, तरी याच शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मात्र जैतापूरला पक्षाचा विरोध नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. "आधी समाधानकारक पुनर्वसन मग प्रकल्प,' अशी भूमिकाही पक्षाने घेतली असली, तरी या निमित्ताने युतीतील दरी पुन्हा एकदा समोर आली आहे. जैतापूर प्रकल्पाबाबत भाजपची राष्ट्रीय पातळीवरील भूमिका अधिकृतरीत्या अद्याप निश्‍चित व्हायची आहे. मात्र, दिल्लीतील भाजपच्या वरच्या फळीने याबाबत माहितीच घेतलेली नाही. सुषमा स्वराज, अरुण जेटली व वेंकय्या नायडू या तिन्ही नेत्यांना जैतापूर विषयाबाबत आज छेडले असता, त्यांनी कोऱ्या चेहऱ्यांनी शांत राहणेच पसंत केले. पक्षाचे लोकसभेतील विरोधी उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी "सकाळ न्यूज नेटवर्क'शी बोलताना, जैतापूर प्रकल्पाला भाजपचा विरोध नसल्याचे स्पष्ट सांगितले. वादात सापडलेल्या जैतापूर प्रकल्पाबाबत फ्रान्सबरोबर नुकताच दिल्लीत करार झाला आहे.
Thursday, December 09, 2010 AT 12:30 AM (IST)
प्रकल्पाला विरोध नसल्याचा भाजपचा खुलासा नवी दिल्ली- जैतापूर या देशातील पहिल्या नागरी अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने कडाडून विरोध सुरू केला असला, तरी याच शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मात्र जैतापूरला पक्षाचा विरोध नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. "आधी समाधानकारक पुनर्वसन मग प्रकल्प,' अशी भूमिकाही पक्षाने घेतली असली, तरी या निमित्ताने युतीतील दरी पुन्हा एकदा समोर आली आहे. जैतापूर प्रकल्पाबाबत भाजपची राष्ट्रीय पातळीवरील भूमिका अधिकृतरीत्या अद्याप निश्‍चित व्हायची आहे. मात्र, दिल्लीतील भाजपच्या वरच्या फळीने याबाबत माहितीच घेतलेली नाही. सुषमा स्वराज, अरुण जेटली व वेंकय्या नायडू या तिन्ही नेत्यांना जैतापूर विषयाबाबत आज छेडले असता, त्यांनी कोऱ्या चेहऱ्यांनी शांत राहणेच पसंत केले. पक्षाचे लोकसभेतील विरोधी उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी "सकाळ न्यूज नेटवर्क'शी बोलताना, जैतापूर प्रकल्पाला भाजपचा विरोध नसल्याचे स्पष्ट सांगितले. वादात सापडलेल्या जैतापूर प्रकल्पाबाबत फ्रान्सबरोबर नुकताच दिल्लीत करार झाला आहे.
Thursday, December 09, 2010 AT 12:30 AM (IST)
प्रकल्पाला विरोध नसल्याचा भाजपचा खुलासा नवी दिल्ली- जैतापूर या देशातील पहिल्या नागरी अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने कडाडून विरोध सुरू केला असला, तरी याच शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मात्र जैतापूरला पक्षाचा विरोध नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. "आधी समाधानकारक पुनर्वसन मग प्रकल्प,' अशी भूमिकाही पक्षाने घेतली असली, तरी या निमित्ताने युतीतील दरी पुन्हा एकदा समोर आली आहे. जैतापूर प्रकल्पाबाबत भाजपची राष्ट्रीय पातळीवरील भूमिका अधिकृतरीत्या अद्याप निश्‍चित व्हायची आहे. मात्र, दिल्लीतील भाजपच्या वरच्या फळीने याबाबत माहितीच घेतलेली नाही. सुषमा स्वराज, अरुण जेटली व वेंकय्या नायडू या तिन्ही नेत्यांना जैतापूर विषयाबाबत आज छेडले असता, त्यांनी कोऱ्या चेहऱ्यांनी शांत राहणेच पसंत केले. पक्षाचे लोकसभेतील विरोधी उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी "सकाळ न्यूज नेटवर्क'शी बोलताना, जैतापूर प्रकल्पाला भाजपचा विरोध नसल्याचे स्पष्ट सांगितले. वादात सापडलेल्या जैतापूर प्रकल्पाबाबत फ्रान्सबरोबर नुकताच दिल्लीत करार झाला आहे.
Thursday, December 09, 2010 AT 12:30 AM (IST)
पुणे - देशातील सर्वांत मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पासाठी जैतापूर (ता. राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील जागा अत्यंत उत्कृष्ट आहे, असा दावा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी मंगळवारी येथे केला. ""या प्रकल्पाचा कोकणातील शेती, पाणी आणि सागरी जैवसृष्टी यांच्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही,'' असेही त्यांनी ठणकावून सांगितले.  पर्यावरणवादी, मच्छीमार आणि शेतकरी यांच्या विरोधामुळे दहा हजार मेगावॉटचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वादग्रस्त ठरला आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी त्यास हिरवा कंदील देताना विविध प्रकारच्या 33 अटी घातल्या आहेत. तरीदेखील आंदोलनकर्त्यांचे समाधान झालेले नाही. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. काकोडकर यांनी प्रकल्पाचे ठोस समर्थन केले आहे. विशेष म्हणजे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष या नात्याने जैतापूरची जागा निश्‍चित करण्यामध्ये डॉ. काकोडकर यांची भूमिका लक्षणीय होती.
Wednesday, December 01, 2010 AT 02:30 AM (IST)
पुणे - जैतापूर प्रकल्पानंतर राज्यातील धोपावे आणि दोंडाईचा येथील प्रकल्पांना पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. विद्युत प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध होतच राहील, पण त्यांना विश्‍वासात घेऊन विकासकामांवर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.    ते म्हणाले, ""एन्रॉन प्रकल्पासही मोठा विरोध झाला. त्यानंतर त्याच ठिकाणी आता दाभोळ या नावाने विद्युत प्रकल्प सुरू आहे. पण या प्रकल्पामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी झालेली नाही. आजही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शेती होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास या नावाखाली जे विरोध करत आहेत ती बाहेरून आलेली मंडळी आहेत. अशा बाहेरच्या मंडळींचे "उद्योग' न जुमानता हे प्रकल्प राबविण्याची गरज आहे. जैतापूर प्रकल्पामुळे स्थानिक पाच गावांचा चांगल्याप्रकारे विकास होणार असून 10 हजार मेगावॉट वीज निर्मितीच्या बदल्यात दरवर्षी 1 टक्का निधी या गावांना मिळणार आहे.
Tuesday, November 30, 2010 AT 02:30 AM (IST)
पुणे - जैतापूर प्रकल्पानंतर राज्यातील धोपावे आणि दोंडाईचा येथील प्रकल्पांना पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. विद्युत प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध होतच राहील, पण त्यांना विश्‍वासात घेऊन विकासकामांवर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.    ते म्हणाले, ""एन्रॉन प्रकल्पासही मोठा विरोध झाला. त्यानंतर त्याच ठिकाणी आता दाभोळ या नावाने विद्युत प्रकल्प सुरू आहे. पण या प्रकल्पामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी झालेली नाही. आजही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शेती होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास या नावाखाली जे विरोध करत आहेत ती बाहेरून आलेली मंडळी आहेत. अशा बाहेरच्या मंडळींचे "उद्योग' न जुमानता हे प्रकल्प राबविण्याची गरज आहे. जैतापूर प्रकल्पामुळे स्थानिक पाच गावांचा चांगल्याप्रकारे विकास होणार असून 10 हजार मेगावॉट वीज निर्मितीच्या बदल्यात दरवर्षी 1 टक्का निधी या गावांना मिळणार आहे.
Tuesday, November 30, 2010 AT 02:00 AM (IST)
राजापूर - तालुक्‍यातील माडबन येथील केंद्र शासनाच्या प्रस्तावित जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी "हिरवा कंदील' दाखविल्याने या प्रकल्पाच्या उभारणीतील मार्ग सुकर झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर स्थानिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी जनहित समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर यांनी सांगितले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी मिळाली असली तरी संपूर्ण कोकणाला उद्‌ध्वस्त करणाऱ्या या प्रकल्पाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम राहणार असल्याचे जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पविरोधी जनहित सेवा समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर यांनी सांगितले. न्यायालयाच्या चौकटीत राहून सुरू असलेला स्थानिकांचा विरोध यापुढेही कायम राहणार आहे. प्रकल्पाला पर्यावरणीय मंजूरी देण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्यादृष्टीने तज्ज्ञांशी चर्चा सुरू असून लवकरच याबाबत न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात येणार आहे.
Tuesday, November 30, 2010 AT 01:13 AM (IST)
रत्नागिरी -  जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी 1650 मेगावॉट क्षमतेच्या सहा अणुभट्ट्या उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी संपादित केलेली 938 हेक्‍टर एवढीच जमिनीची आवश्‍यकता असून यापेक्षा जास्त जमिनीची आवश्‍यकता नाही. त्यामुळे भविष्यात अजून जमिन संपादित करण्याचा प्रस्ताव नाही, असे स्पष्टीकरण प्रकल्पातर्फे देण्यात आले आहे. समाजातील काही अज्ञान व्यक्ती माडबन गाव व सभोवतालच्या परिसरातील भौगोलिक नकाशाच्या प्रती वाटून, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी अजून जास्त जमीन संपादित करण्यात येणार आहे, अशी अफवा पसरवीत आहेत. त्यामुळे न्यूक्‍लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने प्रसिद्धीपत्रकातून हे स्पष्टीकरण दिले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, एनपीसीआयएलच्या वतीने माडबन येथे प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा उद्यानामध्ये 1650 मेगावॉट क्षमतेच्या अणुभट्ट्या उभारल्या जाणार आहेत. भारत सरकारने सुरुवातीला ऑक्‍टोबर 2005 मध्ये दोन अणुभट्ट्या उभारण्यासाठी तत्त्वतः मान्यता दिली होती. त्यानंतर ऑक्‍टोबर 2009 मध्ये सहा अणुभट्ट्यांसाठी मंजूरी दिली.
Wednesday, November 03, 2010 AT 12:15 AM (IST)
राजापूर / जैतापूर  -  जेलभरो आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी चक्काजाम करताना नाक्‍यानाक्‍यावर पोलिस तैनात केले होते. त्यामुळे माडबनच्या छावणीचे रूप आले होते. अशा स्थितीतही जिल्हाबंदी घातलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जे. कोळसेपाटील यांनी पोलिसांना गुंगारा देत टी शर्ट, हाफ पॅन्ट असा वेष धारण करून माडबन येथील भगवती मंदिरात पावणेचार वाजता प्रगट झाले. ग्रामस्थांसमोर चिथावणीखोर भाषणे केल्याच्या कारणास्तव श्री. कोळसेपाटील आणि सेझविरोधी प्रकल्पविरोधी आंदोलनाच्या प्रमुख वैशाली पाटील यांना पोलिसांनी जिल्हाबंदी केली होती. त्यांनी प्रकल्पस्थळी येऊन या आंदोलनात सहभागी होऊ नये, म्हणून पोलिसांनी नाकाबंदी केली होती. अशा स्थितीतही कोळसेपाटील यांनी पोलिसांची नाकाबंदी भेदली. वेषांतर करून कोळसेपाटील बोटीतून विजयदुर्गमार्गे अणसुरे पंगेरे येथे आले. त्या ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी पाहिल्यानंतर ते रिक्षातून प्रवास करीत माडबनकडे निघाले मात्र रस्त्यात गाड्यांची पोलिसांकडून तपासणी होत असल्याचे पाहून त्यांनी रिक्षातून रस्त्यानजीकच्या झाडीमध्ये दडी मारली.
Saturday, October 30, 2010 AT 12:00 AM (IST)
राजापूर / जैतापूर    -  तालुक्‍यातील माडबन येथील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आज स्थानिकांनी पुकारलेल्या जेल भरो आंदोलनात पंचक्रोशीतील एक हजारांहून अधिक लोक सहभागी झाले. नेत्यांसह सव्वासातशे लोकांना या वेळी अटक करण्यात आली. सुमारे एक हजार मेगॅवॉट क्षमतेचा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प तालुक्‍यातील माडबन येथे केंद्र शासनातर्फे उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या घोषणेपासून हा प्रकल्प लोकांच्या तीव्र विरोधामुळे वादात सापडला आहे. विविध आंदोलने, न्यायालयीन लढा अशा विविध मार्गांनी प्रकल्पाला सुरवातीपासून स्थानिकांचा विरोध होत आहे. अशा स्थितीतही प्रकल्पाला शासनाकडून मंजुरी मिळाली असून, प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने कामाला सुरवात झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सेझविरोधी आंदोलनाच्या नेत्या वैशाली पाटील, डाऊ प्रकल्पविरोध आंदोलनात सहभागी झालेले माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांच्यासह अनेकांनी या प्रकल्पविरोधाची धार तीव्र केली. व्यापक आंदोलन उभारून प्रकल्प रद्द करण्यासाठी जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांनी माडबन येथे एका बैठकीत दिला होता.
Saturday, October 30, 2010 AT 12:00 AM (IST)
मुंबई - जैतापूर येथे 10 हजार मेगावॉट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प होणारच, असा ठाम विश्‍वास महसूलमंत्री नारायण राणे यांनी आज येथे केला. येथील प्रकल्पग्रस्तांचे दर्जेदार पुनर्वसन होईल, अशी घोषणाही राणे यांनी केली.  जैतापूर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे शोषण होणार नाही, त्यांचे पुनर्वसन करतांना वाढीव मोबदला दिला जाईल, त्यासाठी जातीने लक्ष घालेन, अशी ग्वाहीही राणे यांनी या प्रकल्पाच्या पुनर्वसन योजनेबाबतच्या पॅकेजची घोषणा करताना दिली. प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या प्रतवारीप्रमाणे प्रति हेक्‍टर 58 हजार ते सहा लाख 30 हजार रुपये असा दर जमिनीसाठी देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. राष्ट्रीय अणुऊर्जा महामंडळ (एनपीसीआयएल) जैतापूर येथे उभारत असलेल्या 10 हजार मेगावॉटच्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या पुनर्वसन योजनेबाबतचा सामंजस्य करार आज झाला. यावेळी राणे यांनी या पॅकेजमधील मोबदला प्रस्तावित आहे, त्यात निश्‍चितपणे वाढ होईल, असे आश्‍वासन दिले. "एनपीसीआयएल'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. के. जैन, पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव जे. एस.
Sunday, October 17, 2010 AT 12:15 AM (IST)
http://72.78.249.126/esakal/SearchNews.aspx?tag=jaitapur%20nuclear%20power%20project

No comments:

Post a Comment