Monday, December 13, 2010

जैतापूर पंचक्रोशीतील स्थानिकांच्या मागण्या पूर्ण करून देणार : रमेश कीर










 जैतापूर अणूउर्जा प्रकल्प हा देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे त्याची उभारणी होणारच आहे. स्थानिकांच्या ज्या काही न्याय्य मागण्या आहेत त्या शासनाच्या माध्यमातून सोडविण्यास काँग्रेस कटीबध्द असल्याचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. स्थानिकांच्या ज्या काही मागण्यात आहेत त्या मान्य होईपर्यंत काँग्रेस पक्ष जनतेसोबतच राहिल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री नारायण राणे यांची भेट घेवूनही स्थानिक जनतेच्या मागण्यांची पुर्तता होण्यासाठी विनंती केली. यामध्ये मच्छिमारांना विशेष पॅकेज, जमिनीचा वाढीव मोबदला देण्यासाठी आपण आग्रही असल्याचेही जिल्हाध्यक्षानी सांगितले.





google-site-verification=zBpwU8zDr93JMzLAb4I3DRLiX59c06PmyNTM04ixDA0

No comments:

Post a Comment