Monday, December 13, 2010

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाचा आता तरी शासनाने विचार करावा : राजन साळवी, बाळ माने
कोकणातील उर्जा प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणामुळे सरकारकडून कोणतेही नियंत्रण नाही. अणूउर्जा प्रकल्प जनतेवर लादला जातोय अशा अनेक गोष्टींसह डॉ. माधवराव गाडगीळ यांच्या समितीचा अहवाल सादर झाला आहे. शासनाने आता तरी भानावर यावे. जैतापूर अणूउर्जा प्रकल्पाला हटवण्यासाठी आपण जनतेच्या सोबतच आहे. जीव गेला तरी बेहत्तर पण प्रकल्प होवू देणार नाही असा इशारा आ. राजन साळवी यांनी दिला आहे. तर भाजपाचे नेते मा. आ. बाळ माने यांनी डॉ. गाडगीळ समितीच्या मतांचा शासनाने विचार करावा अशी मागणी केली आहे.
 

No comments:

Post a Comment